Headlines

आमदार रमेशदादा पाटील आणि शाणाभाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेल्या समाजबांधवांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा मागण्याचे निवेदन सादर केले….

मुंबई: (कोळी महासंघ प्रसिद्धी प्रमुख)- महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी या अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट जातींमधील अनेक समाजबांधवांना पात्र असताना देखील जातीचे दाखले मिळत नाहीत. तसेच १९५० पूर्वीचे पुरावे देऊन सुद्धा अनेकांची जात पडताळणी प्रकरणे अवैध ठरवली जात आहेत. यावर अनेक वेळा आंदोलन करून ही न्याय मिळत नसल्याने पुन्हा एकदा आदिवासी…

Read More

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत वाल्मीक जयंती संपन्न… 

दिनांक 26 11 2023: निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येते काल दिनांक 26 11 2023 रोजी महासंघाचे पदाधिकारी आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार अभिमन्यू पवार यांनी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले आणि सहसचिव सतीश धडे यांनी तसेच प्रास्ताविकामध्ये…

Read More

आदिवासी कोळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश इंगलवाड यांच्या उदगीर येथील पंकजा हॉटेल चे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन…

आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष श्री अंकुश इंगळवाड याच्या पंकजा हाॅटेल चे उदगीर येथील नाईक चौकात पंकजा हॉटेल या फर्मचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा लातूर चे पालक मंत्री मा. ना. श्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाश इंगळवाड यांचे मित्र परिवार आणि संघटनेतील अनेक जण उपस्थित होते.. राहुल…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी तातडीने कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी सोडले

मुंबई दि. 24 : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी तातडीने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी…

Read More

भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनांना मागणी मसाले, गूळ, हळद, मध, पैठणी, मनुका, कोल्हापुरी चप्पल खास मागणी…

नवी दिल्ली, दि.24 : कोल्हापूरचा मसाला, गुळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, पैठणची पैठणी यासह राज्यातील विविध पारंपरिक वस्तुंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात वाढती मागणी मिळत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे दरवर्षी 14 ते 27…

Read More

अनुसूचित जाती घटकांच्या योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी

मुंबई दि. २३ : राज्यात अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विशेषत: केंद्रपुरस्कृत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून यापुढेही या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी केले. अनुसूचित जातींसाठी राज्याच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्री. नारायणस्वामी…

Read More

दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय – एसटी बस स्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० ट्क्के स्टॉल्स राखीव ठेवणार

*शासकीय नोकऱ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली* *स्वाधारच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करणार* *दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* मुंबई, दि. २२ – राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

मुंबई, दि. 22 (रा.नि.आ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.   राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या…

Read More

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शिवडीत २५ नोव्हेंबरला आयोजन

मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महानगरपालिका शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छुक बेरोजगार युवक आणि युवतींसाठी रोजगार…

Read More

तोरणमाळ म्हणजे निसर्गसौंदर्य, इतिहास, निसर्गोपचारासह साहसी क्रीडा पर्यटनाच्या अमर्याद संधी-आदिवासी विकास मंत्री

नंदुरबार, दिनांक १९ – महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ही तोरणमाळची ओळख आहेच, परंतु त्यापलीकडे निसर्गसौंदर्य, इतिहास,  आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रीडा पर्यटन यासारख्या वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या येथे मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत…

Read More