लोणावळा: दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही ( २०२४) कोळी महासंघाचे चिंतन शिबिर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले . या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पदाधिकारी व कोळी बांधवांनी सहभाग घेतला तर या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच लोकसभा निवडणूक २०२४ साठी कोळी महासंघाची दिशा काय असावी या विषयावर प्रामुख्याने चर्चा संपन्न झाली .
कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतनदादा पाटील यांनी प्रास्ताविक करताना आदिवासी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरीता कोळी महासंघ व आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर करीत असलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती समाज बांधवांना दिली. महासंघाचे सहसचिव श्री . सतीश धडे यांनी श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोळी महासंघाने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या उत्कर्षासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा सर्व पदाधिकाऱ्यांसमोर मांडला.
या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करताना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार श्री . रमेशदादा पाटील यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा . श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपला देश “सबका साथ, सबका विकास” या ब्रीदवाक्यानुसार विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीसजी व प्रदेशाध्यक्ष श्री .चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मा .श्री नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी व तिसऱ्यांदा त्यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी कोळी समाजाने महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.त्याचप्रमाणे आपल्या कोळी समाजाचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा तसेच रक्त नातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लवकरच सुटणार असल्याचे सांगितले . यावेळी महाराष्ट्रातील कोळी महासंघाच्या विविध पदांवर नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सुपूर्द करण्यात आले .
जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बाबतचा प्रश्न २० अक्टोबर २०२३ च्या सह्याद्री अतिथी ग्र्याहावतील बैठकीत सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्यावर
काम चालू आहे पण झाले पाहिजे होते याबाबत बऱ्याच पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली असता कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष ॲड . चेतन रमेशदादा पाटील यांनी यावेळी देशासाठी मोदी सरकारला आपण पाठिंबा देतोय..आपला प्रश्न सोडवत असल्याचे आश्वासन अपुरे राहिले आहे याची खंत अनेक जनासह मला ही आहे… विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत ९ ऑगस्ट ला आदिवासी दिनी आपल्या सह बैठक घेवून पाठिंब्याचा पुनर्विचार करू प्रसंगी विरोधात पण समाजासाठी लढू असे ठोस आश्वासन दिले. राज्य सरकार ही वेळ येवू देणार नाही…आली तर विरोधासाठी सगळ्यात पुढे मी असेन याची ग्वाही देतो.
चिंतन शिबिरात कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री . प्रकाश बोबडी, उपनेते श्री . देवानंद भोईर, उपाध्यक्ष श्री . साईनाथ अभंगराव, उपाध्यक्ष श्री . विठ्ठल इरले, नगराध्यक्ष श्री .लक्ष्मणभाऊ पापरकर, उपाध्यक्ष श्री . शिवशंकर फुले, ॲक्शन कमिटी प्रमुख श्री . चंद्रकांत घोडके, सहसचिव मिडिया प्रमुख सतीश धडे,महिला उपाध्यक्ष सौ . रुक्मिणीताई अंबिगर, श्री .अरुण लोणारी, श्री . पहाडसिंग सुरडकर, श्री .अभय पाटील, श्री . शंकर मनाळकर, श्री . बाबासाहेब सैंदाणे, श्री . मुकेश सोनवणे, श्री . सुभाष कोळी, श्री . काशिनाथ दांडगे तसेच महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन विकास सुर्यवंशी यांनी केले.


