Headlines

राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी – राम नाईक , सदस्य पदी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील

मुंबई, दि. २५ : भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्यव्यवसाय विकास धोरण होत असून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे….

Read More

पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी – दीपक हनुमान कैतके यांची निवड

मुंबईदि. २४ : पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी दीपक हनुमान कैतके यांची आज निवड करण्यात आली. समितीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य विभव बिरवटकर, राजू सोनवणे, चंदन शिरवाळे, विनया देशपांडे उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार ही समिती…

Read More

मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी हर्णे येथे कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक…

Read More

इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. २४ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष…

Read More

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा..

मुंबई  : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार,…

Read More

‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचे विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या…

Read More

विकास मोतीराम कोळी यांच्या , “मुंबई कोळ्यांची?” पुस्तकाचे प्रकाशन आमदार कपिल पाटील व आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न …

समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा : आमदार कपिल पाटील मुंबई कोळ्यांची? पुस्तकाचे प्रकाशन संपन्न मुंबई दिनांक 20 ऑगस्ट मुंबईच्या नगररचनेच्या नावाखाली येथील स्थानिकांना चिरडून विकास साधला गेला त्यानेच कोळ्यांच अस्तित्व संपुष्टात आणल आहे आणि म्हणून उरला सुरला समुद्र त्यांच्या हक्काचा आहे. त्या समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा अशी जोरदार मागणी जनता दल युनायटेड चे राष्ट्रीय…

Read More

पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील  पीक मागील दोन महिने पाऊस नसल्या कारणामुळे पूर्णपणे करपून जात आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझ्हाक या रोगामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत असल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुके हे कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना…

Read More

कोळी समाजातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता आणि हरहुन्नरी चित्रकार तानाजी कळकुटे यांचे निधन…

निलंगा,दि.२० निलंगा तालुक्यातील हाडगा या गावचे रहिवासी कोळी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष तानाजी कळकुटे यांचे निधन… उत्कृष्ट पेंटर (चित्रकार) असणारे तानाजी चित्राच्या माध्यमातून निर्जीव भिंतीमध्ये जीव भरवणारा, अनेक तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील  शाळांमध्ये जाऊन बोलके चित्र काढणारा, या धावपळीच्या जीवनामध्ये दोन मिनिट थांबून त्यांची चित्र पाहावे अशी कला साकारणारा मौजे हाडगा ता निलंगा जिल्हा लातुर…

Read More

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती..मंत्रिमंडळ निर्णय (दि. ३ मे २०२३) महाराष्ट्र राज्य

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती.. कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या…

Read More