आंदोलकांच्या भावनांशी शासन सहमत; कायदा-सुव्यवस्थेसाठी शासनाला सहकार्य करा,मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २: “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले…


