Headlines

मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी हर्णे येथे कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक…

Read More

इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. २४ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष…

Read More

वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावा – ‘मित्रा’च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मित्रा’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा..

प्रधानमंत्र्यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे काम करा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी ‘मित्रा’ ची भूमिका महत्त्वाची मुंबई, दि. 18 :- केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विशेष सादरीकरणाद्वारे सविस्तर…

Read More

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा..

मुंबई  : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार,…

Read More

‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचे विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या…

Read More

विकास मोतीराम कोळी यांच्या , “मुंबई कोळ्यांची?” पुस्तकाचे प्रकाशन आमदार कपिल पाटील व आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न …

समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा : आमदार कपिल पाटील मुंबई कोळ्यांची? पुस्तकाचे प्रकाशन संपन्न मुंबई दिनांक 20 ऑगस्ट मुंबईच्या नगररचनेच्या नावाखाली येथील स्थानिकांना चिरडून विकास साधला गेला त्यानेच कोळ्यांच अस्तित्व संपुष्टात आणल आहे आणि म्हणून उरला सुरला समुद्र त्यांच्या हक्काचा आहे. त्या समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा अशी जोरदार मागणी जनता दल युनायटेड चे राष्ट्रीय…

Read More

कोळी समाजातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता आणि हरहुन्नरी चित्रकार तानाजी कळकुटे यांचे निधन…

निलंगा,दि.२० निलंगा तालुक्यातील हाडगा या गावचे रहिवासी कोळी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष तानाजी कळकुटे यांचे निधन… उत्कृष्ट पेंटर (चित्रकार) असणारे तानाजी चित्राच्या माध्यमातून निर्जीव भिंतीमध्ये जीव भरवणारा, अनेक तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील  शाळांमध्ये जाऊन बोलके चित्र काढणारा, या धावपळीच्या जीवनामध्ये दोन मिनिट थांबून त्यांची चित्र पाहावे अशी कला साकारणारा मौजे हाडगा ता निलंगा जिल्हा लातुर…

Read More

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती..मंत्रिमंडळ निर्णय (दि. ३ मे २०२३) महाराष्ट्र राज्य

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती.. कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या…

Read More

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान…

Read More
vijay gavit

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित याच्याकडे सह आयुक्त यांच्या बदलीची मागणी…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्री रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जात पडताळणी समिती सहआयुक्त पदावर कार्यरत श्रीमती संगीता चव्हाण यांची तात्काळ बदली करण्याबाबत पत्र दिले.  संगिता चव्हाण या जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीतील बांधवांचे जात वैधता तपासणी प्रकरणे प्रलंबित ठेवत आहेत. तसेच…

Read More