ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्या-वस्त्यांना मिळणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दिनांक २ ऑक्टोबर २०२३ (जि.मा.का.वृत्त) ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’ योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्यावस्त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशही…


